काल सकाळपासून, खरंतर पहाटे पासूनच कुमारांचा दुर्गा ऐकत होते. हा काही पाहाटे ऐकायचा राग नाही, पण मन की मँगोको समय की क्या पाबंदी? आणि दुर्गा सारखा आनंद देणारा राग ऐकायला तर वेळ काळ कशाला पहायची? सकाळी लिहिताना, स्वयंपाक करताना, नन्तर दुपारी वाचताना, संध्याकाळी फिरायला गेले तेव्हा सगळ्याच वेळी दुर्गा मला निखळ आनंद देत होता. मंदिराच्या गाभ्यात केशराचा सुगंध असलेलं तीर्थ प्यावं आणि त्याची चव आणि वास संपूर्ण शरीरात भिनून एक प्रसन्न पवित्र आनंद वाहत आहे असं वाटत होतं. आणि त्यातून रिमझिम पडणाऱ्या पावसानं तर अंतर्बाह्य नितळ झाल्यासारखं वाटत होतं...
कुमार गात होते...
आमोना रे, अब रे,
बन गया मै का कहू रे..
सुरन के संग जो
समझ लो रे मै जो कहू रे...
प्रत्येक बंदीशीत कुमारांना काहीतरी गोष्ट सांगायची असते. या बंदीशीत ते सांगतात,
आता मौन बास झालं. आतल्या आत बोलणं फार झालं, आता मी जे सुरांबरोबर नातं जोडलं आहे, त्या प्रवासात मी स्वतःच बदलून गेलोय, ते तुम्हाला सांगणार आहे. मी काय म्हणतोय ते समजून घ्यावे...
पण मग हे सांगण्यासाठी दुर्गा हाच राग योजयचं वैशिष्ट्य काय होतं?
कदाचित मी या सुरांच्या मैत्रीतून आता आनंदमूर्ती झालोय आणि जो आनंद माझ्यात पाझरतोय तो मी सर्वांना देणार आहे, असं तर कुमारांना म्हणायचं नसेल? आमोना रे ऐकताना मला तरी असं खूप वेळा वाटतं... कारण दुर्गा हा फार प्रसन्न वृत्तीचा राग आहे...ती प्रसन्न शांतता, समाधान कानातून, मनात, झिरपत राहते...
पण रात्री अपघातानंच किशोर कुमारचं
कुछ तो लोग काहेंगे, लोगोंका काम है केहेना, हे कानावर पडलं आणि पुढची संपूर्ण रात्र
चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये,
मुसाफिर हु यारो, न घर है ना ठिकाना..
खिलते है गुल यहा, खिलके बिछाडने को मिलते हे दिल यहा..
हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले...
ओ बाबू...या सगळ्या माहोलात गेली, झोप येणं तर शक्यच नव्हतं... या सगळ्याच गाण्यांमध्ये आलेल्या छटा किशोर कुमारच्या वास्तव आयुष्यात आलेल्या आहेत..त्या मुळे रात्र अजूनच गहिरी होत गेली जणू काही त्याच्याबरोबर एकेका गण्यासोबत मीच एक एक पेग रिचवत होते...
कारण तीर्थ जितकं गरजेचं तीतकीच मदिरेची नशा ही.
अमृता देशपांडे
लिंक्स :
https://youtu.be/_Sm_agM4O24
https://youtu.be/b_iSFNJmAhU
कुमार गात होते...
आमोना रे, अब रे,
बन गया मै का कहू रे..
सुरन के संग जो
समझ लो रे मै जो कहू रे...
प्रत्येक बंदीशीत कुमारांना काहीतरी गोष्ट सांगायची असते. या बंदीशीत ते सांगतात,
आता मौन बास झालं. आतल्या आत बोलणं फार झालं, आता मी जे सुरांबरोबर नातं जोडलं आहे, त्या प्रवासात मी स्वतःच बदलून गेलोय, ते तुम्हाला सांगणार आहे. मी काय म्हणतोय ते समजून घ्यावे...
पण मग हे सांगण्यासाठी दुर्गा हाच राग योजयचं वैशिष्ट्य काय होतं?
कदाचित मी या सुरांच्या मैत्रीतून आता आनंदमूर्ती झालोय आणि जो आनंद माझ्यात पाझरतोय तो मी सर्वांना देणार आहे, असं तर कुमारांना म्हणायचं नसेल? आमोना रे ऐकताना मला तरी असं खूप वेळा वाटतं... कारण दुर्गा हा फार प्रसन्न वृत्तीचा राग आहे...ती प्रसन्न शांतता, समाधान कानातून, मनात, झिरपत राहते...
पण रात्री अपघातानंच किशोर कुमारचं
कुछ तो लोग काहेंगे, लोगोंका काम है केहेना, हे कानावर पडलं आणि पुढची संपूर्ण रात्र
चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये,
मुसाफिर हु यारो, न घर है ना ठिकाना..
खिलते है गुल यहा, खिलके बिछाडने को मिलते हे दिल यहा..
हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले...
ओ बाबू...या सगळ्या माहोलात गेली, झोप येणं तर शक्यच नव्हतं... या सगळ्याच गाण्यांमध्ये आलेल्या छटा किशोर कुमारच्या वास्तव आयुष्यात आलेल्या आहेत..त्या मुळे रात्र अजूनच गहिरी होत गेली जणू काही त्याच्याबरोबर एकेका गण्यासोबत मीच एक एक पेग रिचवत होते...
कारण तीर्थ जितकं गरजेचं तीतकीच मदिरेची नशा ही.
अमृता देशपांडे
लिंक्स :
https://youtu.be/_Sm_agM4O24
https://youtu.be/b_iSFNJmAhU
अ प्र ति म
ReplyDeleteThanks
ReplyDeleteReally nice article mam. Wish you all the best and definitely looking forward to read more blogs from you.
ReplyDeleteसुपर
ReplyDeleteThanks..
Delete